कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग २

( कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग १, वाचण्यासाठी इथे क्लिक करा )

मी कोकणदिवा, आणि मित्रहो तुम्हाला माहिती असेलच माझी ऊंची रायगडा पेक्षा जास्त आहे. मी रायगडापेक्षा उंच आहे. मला रायगड स्पष्ट दिसतो. त्यावरील नगारखाना दिसतो, जगदिश्वराचा प्रासाद दिसतो, टकमक टोक दिसते, सदर दिसते, बाजरपेठ दिसते! सगळ अगदी स्पष्ट दिसत मला. आजही आणि पुर्वी देखील मी पाहीलाय रायगड माझ्या कातळी नजरांनी.

मला व्यवस्थित आठवतय त्या दिवशी रायगडावर, महाराज साहेबांच्या वाड्या मधील सदरेमध्ये सगळे राजघराणे चिंतातुर होऊन बसले होते.

एकामागुन एक गुज बातम्या हेरांकडुन राजघराण्याला व कारभा-यांना समजत होत्या. त्यातील पहीली बातमी होती छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेब बादशहाने केलेली क्रुर, अमानवी हत्या. त्या पाठोपाठच अनेक बातम्या येऊन थडकत होत्या. कधी का किल्ला बादशहाने जिंकला तर कधी तो जिंकला.

बादशहाने आदिलशहाला धुळीस मिळवल्यावर पुन्हा स्वराज्याचा घास घेण्याचा मोठा डाव रचला. त्याचाच भाग म्हणुन जुल्फिकार खानाला रायगडाला वेढा घालण्यास कोकणात पाठवणे. जुल्फीकार खान कसोशीने रायगडाभोवती फास आवळत होता. एकेक वाट अडवत होता, एकेक गाव मारीत होता. स्वराज्याचा अश्वमेध जितक्या वेगाने दौडत होता, तितक्याच वेगाने औरंगजेब संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्य गिळण्यासाठी पावले टाकत होता. स्वराज्याचा हा अश्व आता सारथ्या शिवायच पळत होता की काय असे मला कित्येकदा वाटायचे. कारण संभाजीपुत्र राजाराम युवराज अजुअन बाल्यावस्थेतच होते. त्यांना स्वराज्याच्या वारुचा वेग सांभाळता येईल की नाही अशी शंका सगळ्यांनाच होती. कसे ही असले तरी, युवराज राजाराम हेच स्वराज्याचे भविष्य आहे, हे जसे मला समजले, हजारो स्वराज्यनिष्ट मावळ्यांना समजले तसेच औरंगजेबाला सुध्दा समजले. आणि त्यामुळेच जुफिकार खानाला जास्तीची मदत म्हणुन देशावरुन शहाबुद्दीन खानाला, घाट उतरुन जुल्फीकार खानाच्या मदतीला रवाना केले. आणि त्या दिवशी याच बातमीने गडावरील सर्वच जण चिंतेत होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात सामिल झाले, अनेक स्वराज्यातुन गेले सुध्दा. पण यावेळी नुसते रायगड शत्रुच्या ताब्यात जाण्याची भीती नव्हती. यावेळी, बाळस धरलेल हिंदवी स्वराज्यच, त्याच्या भावी राजासहीत औरंगजेबाच्या क्रुर पंजामध्ये सापडणार आणि जशी अवस्था पराक्रमी शंभु राजांची औरंगजेबाने केली तशीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भयावह पध्दतीने, स्वराज्याचा हा नवांकुर औरंगजेब कुस्करुन टाकणार. स्वराज्याचा अंत आता निश्चित. आणि पुन्हा सुरु होणार बादहशाची हुजरेगिरी आणि वतनांसाठी आपल्याच भाऊबंदकी, सोयरीकी मध्ये हाणामारी. पुन्हा रयत एखाद्या घाबरलेल्या सशासारखी बादशहा व त्याच्या लबाड लांडग्याच्या भीतीने थरथर कापरे भरुन, भेकडासारखी, मृतवत होणार व तिच्या अन्यायाचे आसुड ओढले जाणार. हा मावळ प्रांत पुन्हा एकदा मुसलमानी अमलाखाली जाणार आणि देवळं रावळावरचे कळस पाडुन तिथे मशिदीचे चांद तारे उभे राहणार, घुमट उभे राहणार. आया बहिणींवर पुन्हा एकदा आभाळ कोसळणार. सामान्यांच्या तोंडातील घास पुन्हा एकदा काढला जाणार. सगळ बुडणार, सगळ संपणार.

jihad in India

राजवाड्यातील हे चिंतेचे सुर माझ्या कानावर येत होतेच. अशा परीस्थीतीमध्ये ही शांतपणे, बुध्दीचातुर्याने योजना बनवणारे आणि त्या योजनांना धैर्याने, शौर्याने पुर्ण करणारे विदवान आणि शुरवीर देखील काही कमी तयार केले नव्हते स्वराज्याने. स्वराज्य या शब्दामध्येच ती जादु होती, आहे. हे राज्य माझ आहे, स्वःतच आहे. हा भाव फक्त शिवराय, शंभु राजे व काही मोजके सरदार यांच्यामध्येच नव्हता तर तो होता अगदी सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये सुध्दा होता. व नेमकी हीच स्वराज्याची खरी ताकत होती, की जी औरंगजेबाला माहित नव्हती.

शहाबुद्दीन खानाच्या प्रत्येक हालचालीच्या बातम्या हेरांकरवी रायगडावर पोहोचत होत्या. शहाबुद्दीन नक्की कोणता घाट उतरुन कोकणात येणार याविषयी नक्की सांगता येत नव्हते. त्यामुळे कारभा-यंनी सगळ्याच घाटवाटांवरील चौक्यांना सावध रहायला सांगितले. इकडे रायगड लढवायचाय, दुसरीकडे जुल्फीकार खानाबे घातलेल्या वेढ्याचे लचके तोडायचे व तिसरीकडे घाट बंदबस्त करायचे. पण हे सगळे करण्यासाठी पुरेशी कुमक स्वराज्याकडे नव्हती. मातब्बर सरदार मावळे परप्रांतांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याशी लढण्यात गुंतले होते. वेळ कमी होता त्याच प्रमाणे माणसेही कमी होती.

माझ्या पायथ्याशीच सांदोशी गाव. महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा पासुनच या गावाचे भाग्य उजळले. थोरली बाजारपेठ येथे भरु लागली. देश विदेशातील व्यापारी इथे येऊन व्यापार करु लागले. समुद्रमार्गे देशावर जाणा-या व्यापा-यांच्या मालाची अदलाबदल, देणेघेणी, आराम अशा अनेक गोष्टींसाठी सांदोशी प्रसिध्दीस आले होते. जुल्फीकार खानाच्या पापी नजरेतुन मात्र हे समृध्द गाव सुटले नाही. जुल्फीकार खानाने ज्याप्रमाणे रायगडाभोवतीची सगळी गावे लुटली त्याप्रमाणेच हे गाव देखील लुटले, मारले, बेचिराख करुन टाकले. या सुल्तनी संकटानंतर गावकरी थोड्या काळाकरता रानावनात आसरा घेऊन राहीले. जुल्फीकार खान थोडा पुढे सरकल्यावर मात्र हळुहळु बापे माणस जमा होऊ लागली व दोचार दिवसांनी बायकापोर, वृध्द लोकदेखील आपापल्या जळुन भस्म झालेल्या घरट्यांना पुन्हा सावरु लागले. चटणीभाकरी अवघड होती, रानवनातुन मिळेल ते खावुन जगायचे होते. पुन्हा शेती करायची होती, धान्य पिकावयचे होते, पुन्हा संसार फुलवायचा होता. काय ही उमेद आणि आशावाद. अहाहा…

सांडोशी गाव भासचित्र

बा रायगडावर जी योजना बनली त्यानुसार आधीच जीवाजी व त्याचे नाईक, खिंड लढवण्यासाठी सज्ज होते व खिंड लढवत देखील होते. गनिमाच्या येण्याची पक्की बातमी आल्यावर माझ्या शिखरमाथ्यावर आदल्या रात्रीच, गंज पेटवुन रायगडाला वर्दी दिली होती. वेळ कमी होता हातामध्ये. तोपर्यंत गडावर आणखी एक बातमी येऊन धडकली. शिक्रापुरचा वतनदार, माणकोजी पांढरे स्वःतच्या हजारेक माणसांसहीत, शाहबुद्दीनला येऊन मिळाला होता. शहाबुद्दीनची ताकत वाढली होती. आणि सोबत घाटवाटांची माहिती असणारा माणकोजी सुध्दा मिळाला. माणकोजी सारखे लोक बुडणा-या नावेतुन उडी मारुन, दुस-या सुरक्षित नावेत जातात यामगे फक्त आणि फक्त स्वार्थ व हुजरेगिरी हेच होते.

माणसांची जमवाजमव करण्यासाठीचे निरोप सांदोशी आणि आजुबाजुच्या गावांमध्ये तातडीने पोहोचले. कठीण युध्द प्रसंग होणार होता. जीवाजी जरी शुर वीर असला तरी त्याला एवढ्या मोठ्या गनिमाला भिडण्याचा दांडगा अनुभव नव्हता. आणि हे एकट्याचे किंवा नऊ-दहा लोकांचे काम नक्कीच नव्हते. काम मग शाहबुद्दीन आणि माणकोजी ला थांबवणार कोण?  नवीनच उगवु पाहणा-या स्वराज्याचा सुर्याला ग्रहण लावण्यासाठी येणा-या राहु केतुला धुळीस मिळवणार कोण?

Godaji Japtap

टिप – या स्वराज्याच्या रक्षकाचा म्हणजेच कोकणदिवा या टेहळणी ठाण्याचा एक व्हिडीयो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Note – This work of fiction is based on the true incident of valor and bravery exhibited  by Maratha warriors during crucial when Shri Sambhaji Maharaj was killed by Aurangzeb. I keep wandering, trekking, camping the ghats of Sahyadri especially near Pune and get to know really inspiring stories of Marathas. 

Facebook Comments

Share this if you like it..